IIT-मुंबई विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर माजी खासदार मुणगेकर यांची एसआयटी चौकशीची मागणी; आंदोलनाचा इशारा

IIT-Bombay Student Darshan Solanki Suicide
Dr Bhalchandra Mungekar
राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, ४ मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर विविध संघटना “धरणे आंदोलन” करणार आहेत. कथित आयआयटी – मुंबई येथी दलित विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) द्वारे व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटना या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

आयआयटी – मुंबई येथील B.Tech च्या प्रथम वर्षात शिकणारा १८ वर्षीय विद्यार्थी दर्शन सोलंकी याने ५ फेब्रुवारी रोजी वसतिगृहाच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

याप्रकरणी, पवई पोलिसांनी अपघाती मृत्यू ची नोंद केली आहे. तरी, दर्शनच्या पालकांना यामध्ये त्याच्यावर जातीय भेदभाव केला गेला असून हि आत्महत्या त्याचमुळे घडली असल्याचा दावा केला आहे.

“दर्शनने जातीभेदाबाबत तक्रार केली होती, पण कोणीही त्याचे ऐकले नाही,” असा दावा दर्शनचे वडील रमेश सोळंकी यांनी केला आहे.

दरम्यान, आयआयटी-मुंबईने एक निवेदन जारी केले आणि जातीय भेदभावाच्या बातम्यांचे जोरदार खंडन केले.

तसेच, आयआयटी-बॉम्बेच्या संचालकांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे.

डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी या समितीच्या चौकशीला विरोध करत या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी सांगितले की “आयआयटी-मुंबईच्या संचालकांनी मागासलेल्या समाजातील काही सदस्य घुसवून कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा समावेश असलेली अंतर्गत समिती स्थापन केली.””पण आम्ही या निर्णयावर खूश नाही कारण अंतर्गत समितीला काही अर्थ नाही.””आम्हाला एसआयटीकडून योग्य तपास हवा आहे.”

“याप्रकरणात, मोठ्या प्रमाणात जातीय भेदभावाचा संशय आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे आई-वडील मुंबईला पोहोचण्यापूर्वी त्यांनी दर्शनचे पोस्टमॉर्टम केले. त्यांनी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या पालकांना दिली नाही. “या सर्व गोष्टींमुळेच संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे,” ते पुढे म्हणाले.

Web Title: IIT-Bombay Student Suicide Case: ex-MP Mungekar demands SIT probe; announces a protest

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde on Onion Farmers ‘कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. 2.38 लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला असून जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल . कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Maharashtra CM Eknath Shinde Says, “Maharashtra Government is with Onion Farmers.”

अहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर करण्याची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

BIP MLC Gopichand Padalkar Demands to changing name of Ahmadnagar महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामांतर करण्यास सरकारने मंजुरी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सोमवारी अहमदनगरचे अहिल्या नगर असे नामकरण करण्याची मागणी केली.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हि मागणी केली आणि ते म्हणाले, “अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्या नगर करण्यात यावे. सर्वांनी केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलले. त्यानंतर अहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर करण्याची मागणी लोक करत आहेत.”

“मराठा साम्राज्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी गावात झाला. अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतला जाईल, असा मला विश्वास आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले.

“औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन.त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात होणारच. @BJP4Maharashtra @mieknathshinde,” असे ट्विट त्यांनी मराठीत केले.

यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामकरण करण्यास मान्यता दिली होती. गृह मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली आणि केंद्र सरकारला महाराष्ट्रातील दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्यास “आक्षेप नाही” असे सांगितले.

Web Title: Maharashtra BJP leader Gopichand Padalkar demands renaming of Ahmednagar as Ahilya Nagar

मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यामध्ये फरक काय?

Marathi Bhasha Gaurav Din 
V V Shirwadkar Kusumagrajलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

कवी सुरेश भट यांच्या या कवितेतून प्रत्येक मराठी मनात आपल्या भाषेविषयी असलेली आत्मीयता प्रकट होते. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती नंतर भाषावार प्रांतरचनेमुळे मराठी भाषिकांसाठी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाच्या विविध भागात बोलली जाणारी मराठी भाषा हि महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून गोवा राज्याची सह-अधिकृत भाषा आहे. मराठी हि देशातील २२ अधिकृत भाषांपैकी एक असून २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या जवळजवळ ९ कोटी आहे. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी हि भारतात तिसऱ्या तर जगात १० व्य क्रमांकावर येते.

मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो?
मराठीतील थोर कवी, लेखक, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त २७ फेब्रुवारी या दिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यात दिलेले योगदान पाहता त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जन्मदिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचा शासन निर्णय २१ जानेवारी २०१३ रोजी घेतला. मराठीतील प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार अशी कुसुमाग्रज यांची ओळख असून त्यांनी मराठीमध्ये सोळा कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, अठरा नाटकं आणि सहा एकांकिका लिहिल्या आहेत.

मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यांमध्ये फरक काय?
मराठी भाषा गौरव दिन’ हा २७ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. परंतु, अनेक जण या दिवशी मराठी राजभाषा दिन समजून शुभेच्छा देतात. मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यामध्ये लोक गोंधळून जात असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळते. मराठी राजभाषा दिन हा १ मे रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याबद्दल १० एप्रिल १९९७ रोजी परित्रकातून हा दिवस साजरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. तेव्हापासून २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन तर १ मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ‘मराठी भाषा गौरव दिवस’ (२७ फेब्रुवारी) आणि ‘मराठी भाषा दिवस’ (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.

Web Title: What is the difference between ‘Marathi Bhasha Gaurav Din’ and ‘Marathi Rajbhasha Din’?

सनातन प्रणाली – एक विवेचन

Sanatan Pranaliकुठलाही पंथ म्हटला की त्याचे एक पुस्तक, त्याला अभिप्रेत एक ईश्वर आणि त्या पंथाची स्थापना करणारा एखादा ‘युगपुरूष’ असलाच पाहिजे अशी आजची धारणा झाली आहे. ही धारणा काही अंशी जरी बरोबर मानली तरी ‘सनातन’ धर्माच्या बाबतीत हा निकष अगदी तोंडावर पडतो! वास्तविक पहाता ‘सनातन’ धर्म ही एक प्रणाली आहे जी अनेक पंथांना, दर्शनांना,चितनांना पूरक आणि पोषक वातावरण प्रदान करते. म्हणूनच ‘धर्म’ हा शब्द या प्रणालीस अगदी चपखल बसतो. ‘धर्म’ या शब्दाची व्युत्पत्ती पहात असताना मूळ धातु ‘धृ’ आहे हे लक्षात येईल. ‘धृ’ चा धारण करणे असा होतो.
यो धारयति इति धर्मः ।
अशी धर्माची व्याख्या केली जाते. याच कारणास्तव, ‘जो धारण करतो (धरून ठेवतो) तो धर्म’ अशी सर्वसमावेशक व्याख्या इतर पंथांपासून वेगळेपण तर दर्शवतेच पण इतर पंथांना, चिंतनांना बरोबर घेऊन जाण्याचा एकात्मिक उद्देश देखील प्रतिपादित करते.

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥
असे सर्वसमावेशक चिंतन जी प्रणाली घेऊन चालते तोच खरा धर्म.
जेव्हा खोडसाळपणे अथवा अज्ञानवश, अश्या प्रणालीचा इतर ‘संकुचित’ (अनादर करण्याचा मानस नाही!) पंथांशी तुलना केली जाते तेव्हा हिंदू धर्माचा ‘धर्मग्रंथ’ शोधण्याची कपोलकल्पित चढाओढ सुरू होते. मूळ मुद्दा हा की जी प्रणाली वेगवेगळ्या, भिन्न चिंतनांना एकत्र घेऊन मार्गक्रमण करू इच्छिते, ती आपली भिस्त एका विवक्षित पुस्तकावर ठेऊच शकणार नाही. कारण तसे केल्याने वेगवेगळ्या चिंतनांमधला विरोधाभास प्रामुख्याने प्रकट होऊन मूळ उद्देशालाच मोठी बाधा उत्पन्न होईल.

भारतामध्ये उगम पावलेल्या सर्वच दर्शनांनी, चिंतनांनी आणि पंथांनी या हिंदू प्रणालीमध्ये (धर्मामध्ये) स्वतःचा अन्तर्भाव करून घ्यायचा नेहमीच प्रयत्न केला आहे असे लक्षात येईल. पूर्णपणे विरोधी विचारांवर आधारित तत्वज्ञाने या प्रणालीमध्ये संलग्न पद्धतीने नांदत असल्याचे आपणास दिसेल. याचे प्रमुख कारण म्हणजे ‘माझाच मार्ग योग्य; इतर अयोग्य’ या विचाराचे सार्वत्रिक दमन! असे दमन झाल्यामुळे दुस-याचा मुद्दा जरी अमान्य असला तरी तो सर्वथा त्याज्य नाही हे मान्य करण्याची प्रगल्भता. ही प्रगल्भता येण्याचे कारण म्हणजे या भूप्रदेशामध्ये वास करणा-या समाजाची हजारो वर्षांची स्मृती, त्या समाजाचा एकत्रित अनुभव आणि त्यातून उत्पन्न झालेली सांस्कृतिक जडण-घडण! सांगण्याचे तात्पर्य इतकेच की हिंदू धर्माला या प्राचीन संस्कृतीपासून वेगळे करून बघताच येणार नाही; कारण तसे केल्यास वर उदृत केलेल्या प्रगल्भतेचाच कुठेतरी नाश होईल. या प्रगल्भतेमुळेच अनेक आराध्य, अनेक देव, अनेक ईश्वर आणि काही वेळेस अगदी ईश्वर न मानणा-या चिंतनांचा अन्तर्भाव सनातन धर्मामध्ये आपल्याला दिसून येईल. आपल्या चिंतनाच्या देखील मर्यादा असू शकतात आणि आहेत हे मान्य करण्याचे ‘औदार्य’ याच प्रगल्भतेमुळे निर्माण होते यात शंका नसावी. असे मान्य केल्यामुळे नविन काहीतरी शोधण्याचा सततचा प्रयत्न या दर्शनांमध्ये दिसतो. म्हणजेच मानण्याच्या ऐवजी शोधण्यावर दिलेला भर सद्सद्विवेकबुध्दीला नेहमीच साद घालत रहातो.

परंतु, काही पंथांमध्ये ऐहिक स्वार्थाकरिता (आर्थिक आणि राजकीय) याच प्रगल्भतेला तिलांजली दिलेली पहावयास मिळते. ईश्वर आणि मनुष्यामध्ये गुलाम आणि मालकाचं किंवा मेंढरं आणि मेंढपाळाचं नातं पहावयास मिळतं. ईश्वराचा एकाधिकार स्थापन करण्याची ‘मानवीय’ चढाओढ दिसून येते. ‘My way or the highway’ ची मानसिकता उफाळून आलेली दिसते. अर्थातच, या सर्व गोष्टी एकेश्वरवादी पंथांमध्ये प्रामुख्याने दिसून येतात. अशी मते ‘मानणारा’ मानव समूह हिंदू धर्माला अभिप्रेत प्रगल्भ, उदार आणि सर्वसमावेशक प्रणालीचा भाग होऊ शकत नाही.

फ्रेन्च क्रान्तिनंतर युरोपामध्ये निर्माण झालेल्या secularism या संकल्पनेने राजकिय व्यवस्था आणि चर्च यांच्यामधील स्वारस्य संघर्षाला (conflict of interest) ला लगाम घातला. त्यामुळे ख्रिश्चन पंथातील ‘आडत्यांच्या’ आर्थिक आणि राजकीय आकांक्षांना खीळ बसली. या आकांक्षा काही अंशी कमी झाल्यामुळे ख्रिश्चन पंथाचे अधिपत्यवादी अक्राळविक्राळ स्वरूप थोडेसे मवाळ झाले. संपुष्टात आलेले नाही आणि तशी अपेक्षा करून कोणी दीवास्वप्न पहात असेल तर त्याला शतशः नमन! इकडे, इस्लाममध्ये असे काही होताना दिसत नाही. आर्थिक आणि राजकीय शक्तीचा उपयोग ‘आस्थासंघर्ष’ पेटवण्यासाठी बेमालूमपणे करण्यात येत आहे आणि त्यातून पुन्हा आर्थिक आणि राजकीय स्वार्थ साधण्याचा दोन कलमी कार्यक्रम इस्लाममध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. इस्लामची धाटणी अशाप्रकारची आहे की त्यामध्ये बदल करणे अशक्यप्राय आहे. इस्लाम न मानणारे (काफर), इस्लाम सोडून दिलेले (मूरतद) आणि इस्लाम मानण्याचे ढोंग करणारे (मुनाफिक) निर्माण होतील पण इस्लाम बदलणे अशक्य आहे ! असा ‘बदल’ घडेल हे स्वप्न पहाणारे, इतर मुसलमानांसारखे न येणा-या ‘आखिरत’ पर्यंत ताटकळत बसतील यात शंका नाही.

भारतीय पंथांमध्ये सुध्दा ‘माझाच मार्ग श्रेयस्कर’ ही संकल्पना कालोघामध्ये उफाळून आलेली उदाहरणे आहेत. परन्तु हे पंथ एका मोठ्या हिंदू प्रणालीचा भाग असल्यामुळे या ‘अस्थायी’ विमर्षाचे शमन,दमन आणि परिमार्जन नेहमीच होत आले आहे. यालाच ‘शास्त्रार्थ’ ही उचित संज्ञा दिली गेलेली आहे. या शास्त्रार्थापासून राजकीय स्वारस्य असणा-या व्यक्तींना आणि मानसिकतांना दूर ठेवण्याचे काम देखील याच प्रणालीने नेहमी केलेले आहे. याच कारणास्तव ‘सनातन’ हा शब्द मोठ्या आत्मविश्वासाने आम्ही या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी वापरतो.

जे समाविष्ट होऊ इच्छितात त्यांच्याकरिता सर्वसमावेशकता आणि जे होऊ इच्छित नाहीत त्यांचे शमन, दमन आणि परिमार्जन या दोन साधनप्रणालींचा सारासारविवेकाने आणि प्रगल्भबुध्दीने केलेला समर्थ उपयोग हेच या संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या अस्तित्वाचे गमक आहे!

आस्थाऽहंकारस्य शमनेन दमनेन परिमार्जनेन वा ।
सर्वसमावेशकी इयं संरचना वसुधायां विराजते ॥

© श्री. काफर इमानदार

 

Web Title: Sanatan Pranali – Ek Vivechan

फरार आरोपीस तब्बल ३२ वर्षानंतर मुंबई पोलिसांकडून अटक

Mumbai Police arrested wanted criminal after 32 yearsदरोडा आणि चोरीप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने फरार घोषित केलेल्या आरोपीस तब्बल ३२ वर्षानंतर बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी विश्वनाथ उर्फ बाळा विठ्ठल पवार (७३) हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील कळवंडवाडी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत, आणि पोलीस निरीक्षक गुन्हे विजय माडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.

हे पथक आरोपीचा शोध घेण्यास सिंधुदुर्ग येथे पोहोचले असता आरोपी हा सद्यस्थितीत विरार येथे राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

सदर आरोपी भाईंदर ईस्ट ठाणे येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके, पोलीस उप निरीक्षक निंबाळकर, पोलीस शिपाई पवार, पोलीस शिपाई गर्जे यांनी सदर पत्त्यावर आरोपीचा शोध घेऊन आरोपीस अटक करण्यात आली.

याबाबत, पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते म्हणाले, “सदर खटला हा न्यायालयात १९९० सालापासून चालू होता पण त्यानंतर आरोपी फरार झाला. आरोपीचे शोधकार्य चालू होते पण तब्बल ३२ वर्षानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. आता यापुढे प्रकरण न्यालयायात प्रविष्ट केले जाईल.”

सदर आरोपीस दिंडोशी सत्र न्यायालय येथे हजर करण्यात येईल.

Web Title: Mumbai Police arrested wanted criminal after 32 years

रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; मराठीतून घेतली शपथ

Maharashtra
Governor Ramesh Bainsमुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री. बैस हे २० वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) के के तातेड, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित नागरिक उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेल्या अधिसूचनेचे वाचन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली. शपथविधी सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.

राज्यपाल रमेश बैस यांचा परिचय

राज्यपाल रमेश बैस हे पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.

संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्री. बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.

दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले श्री. बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.

सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.

सन १९८९ साली श्री. बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.

सन १९८९ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात श्री. बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

सन १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.

सन २००३ साली श्री. बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात श्री. बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

सन २००९ ते २०१४ या काळात श्री. बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन २०१४ ते २०१९या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्री बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.

सन २०१९ साली श्री. बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.

नवनियुक्त राज्यपाल श्री. बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. श्री. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

Web Title: Ramesh Bains became 20th Governor of Maharashtra

भारतीय लोकशाही – शोध आणि आव्हाने

Bhartiya Lokashahi - Shodh aani Awhaneया ग्रंथाला मसाप, पुणे चा वैचारिक लेखनाचा पुरस्कार लाभला होता. भारतापुढे नानाविध प्रकारची आव्हाने उभी आहेत. १९४७ पूर्वी अनेक संस्थानांचा असा हा देश होता. स्वराज्य मिळताच येथील लोकांवर लोकशाही ही नवीन पद्धत थोपण्यात आली. तथापि ती योग्य रीतीने राबविण्याचे प्रशिक्षणच दिले गेले नाही.

व्यक्ती स्वातंत्र्य, समान वागणूक, बंधुता, परधर्मसहिष्णुता आणि आधुनिकतेचा स्वीकार या सगळ्या गोष्टी हिंदूंनी कुठल्याही राजकीय झगड्याशिवाय स्वीकारल्या; तथापि मुसलमानांना मात्र आधुनिकतेचा स्वीकार आणि परधर्मसहिष्णू असण्याची शिकवण ही मुळातच इस्लामच्या शिकवणुकीत नसल्याने, त्यांच्या या मानसिकतेचा लोकशाहीला असलेला उपद्रव आणि धोका हा टाळता येऊ शकेल का? ही मानसिकता अनुनयाने आणि तुष्टीकरणाने बदलू पाहणाऱ्या गांधींच्या राजकारणाचे व शिकवणुकीचे या प्रक्रियेत नेमके योगदान किती? इतिहासाच्या यथार्थ ज्ञानाचा अभाव, तात्कालीन सत्तालाभासाठी दीर्घकालीन राष्ट्रीय हिताचा बळी देण्याची घातकी वृत्ती आणि जातीचा अभिमान बाळगत निर्माण झालेली सामाजिक बेफिकिरी, हे दोष हिंदूंच्या ठिकाणी असल्यामुळे बहुसंख्य असूनही केवळ लोकशाही राज्यपद्धत ही हिंदूंना सबल करू शकेल का? भारतामध्ये इहवादी शासन असेल असे म्हणणाऱ्या घटनेतच २५ व्या कलमानुसार इहवादी शासनाचा गळा घोटण्याची तरतूद आहे, तिचे काय करायचे? मागासलेपणा हा आर्थिक कमजोरी आहे असं समजण्याऐवजी विशेष पात्रता समजल्यामुळे देशात यादवी सदृश्य परिस्थिती निर्माण होते आहे, यावर उपाय काय? अशा अनेक आव्हानांचा शोध घेणारा आणि चिकित्सा करणारा असा हा ग्रंथ आहे.

(पृष्ठसंख्या-₹२७०, मूल्य-₹३७०, सवलत मूल्य-₹२७७, दिलीपराज प्रकाशन, पुणे, ०२०२४४७१७२३, ०२०२४४८३९९५, अमेझॉन- https://amzn.to/3Ijbhqz)

©डॉ. सच्चिदानंद शेवडे

Web Title: Indian Democracy – Inventions and Challenges

Maharashtra Political Crisis | ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या मागणीबाबत निर्णय अद्याप नाही: सर्वोच्च न्यायालय

Supreme Court Maharashtra Political Crisis

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने शुक्रवारी सांगितले की, महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीसंबंधित सात न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठविण्याबाबतचा निर्णय २०१६ च्या नबाम रेबिया निकालाचा पुनर्विचार करून घेण्यात येईल.

मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्तीहिमा कोहली आणि पी. एस.  नरसिम्हा या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, नबाम रेबिया प्रकरणाचा पुनर्विचार मोठ्या खंडपीठाकडे करण्याचा मुद्दा या खटल्याच्या सुनावणीदरम्यान गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेतला जाईल.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, नबाम रेबियाचा निकाल सात न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवायचा की नाही, याचा निर्णय केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातील खटल्यातील गुणवत्तेवर सुनावणीसह घेता येईल. त्यात महाराष्ट्रातील राजकीय प्रकरणांची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानुसार,, “प्रकरणातील तथ्यांशिवाय संदर्भाचा मुद्दा एकाकीपणे ठरवला जाऊ शकत नाही. केसच्या गुणवत्तेनुसारच संदर्भाचा निर्णय घेतला जाईल.”

गुरुवारी, सर्वोच्च न्यायालयाने प्रतिस्पर्धी शिवसेना गटांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने पाच न्यायाधीशांचे नबाम रेबिया प्रकरण पुनर्विचारासाठी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्याची मागणी केली.

२०१६ च्या नबाम रेबिया प्रकरणात, पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने असे मानले होते की जेव्हा स्पीकर त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणारा ठराव प्रलंबित असेल तेव्हा ते अपात्रतेची कार्यवाही सुरू करू शकत नाहीत.

सेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले की, नबाम रेबिया प्रकरणात घालून दिलेल्या कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

“नबाम रेबिया आणि १० व्या अनुसूचीकडे पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे कारण यामुळे कहर झाला आहे,” सिब्बल म्हणाले.

राज्यघटनेच्या १० व्या अनुसूचीमध्ये, राजकीय पक्षातून निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांच्या पक्षांतरास प्रतिबंध करण्याची तरतूद आहे आणि त्यात पक्षांतरांविरुद्ध कठोर तरतुदी आहेत.

 

Web Title: Maharashtra Political Crisis| Supreme Court to decide later on referring pleas to  7 judge bench

ठाण्यात आमदार आव्हाड यांचे महापालिका अधिकारी महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप

MLA Jitendra Awhad Allegations on Mahesh aaherराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्यासाठी कुख्यात गुंड बाबाजी उर्फ सुभाष सिंग ठाकूर याला सुपारी दिल्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. त्यानंतर त्यातील आवाज हा ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी ठाणे महानगरपालिकेच्या आवारात महेश आहेर यांना मारहाण केली होती.

त्यानंतर, जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे आरोपांच्या फैरी झाडत महेश आहेर यांच्या केबिनमध्ये एक व्यक्ती नोटांचे बंडल मोजत असल्याचं व्हिडीओ ट्विट केला आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये महेश आहेर हे त्यांच्या केबिनमध्ये एका व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देताना दिसत आहेत.

वायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये महेश आहेर हे अन्य दोघांबरोबर संभाषण साधत जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख नाग असा करून त्यांना ठेचण्याची भाषा करत आहेत.

ह्या ऑडिओ क्लीपमध्ये महेश आहेर म्हणत आहेत कि, ” पोलीस कमिशनर, एकनाथ शिंदे यांच्याकडे मी रेकॉर्ड पाठवून ठेवलेत कि आव्हाड माझा कधीही मर्डर करेल, माझ्याविरोधात काहीही करू शकेल. मी हे बॅकग्राऊंडला क्रिएट करून ठेवले आहे. जितेंद्र आव्हाड हा नाग आहे आणि मला त्याला ठेचायचा आहे.”

बाबाजी नामक कुख्यात गुंडाकडे आव्हाड यांच्या मुलीची आणि जावयाची सुपारी स्पेनमध्ये दिली असल्याचेही या ऑडिओ क्लिप मधून समोर आले आहे.
ते पुढे म्हणाले कि, ” मी आमचे शूटर बाबाजीला सांगून स्पेनमध्ये लावले आहेत… त्याचा जावई ठाण्यात आला नाही तर त्याचा बापावर अटॅक केल्यावर तो एक दिवसासाठी ठाण्यात येईल.. मी एअरपोर्ट पासून फिल्डिंग लावेल.. त्याची गेम करणार. त्याच्या ( जितेंद्र आव्हाड) पोरीला रडायला लावणार म्हणजे कळेल त्याला पोरीचं दुःख काय असतं..”

हि ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना ठाणे महानगरपालिकेच्या आवारात मारहाण केली होती. याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: MLA Jitendra Awhad made serious allegations against Municipal officer Mahesh Aher