मुंबई : शिवसेना भाजपा जागावाटपाचा तोडगा अजूनही सुटला नाही. या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, युतीतील जागावाटप फाळणीपेक्षाही भयंकर आहेत. राऊत यांनी उद्विग्नता व्यक्त केल्यामुळे युती होणार की नाही अशी शंका उपस्थितीत होत आहे.
युती बाबत सध्या तरी तारीख पे तारीख सुरु आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. युती बाबत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राऊत या बाबत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, युती बाबत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे निर्णय घेतील. 288 जागा आहेत. एक एक जागेवर चर्चा करावी लागतं आहे असे सांगितले.
युतीबाबत कोणता पक्ष किती जागा लढवणार आहेत त्याची माहिती माझ्याकडे नाही. जी काही आकडेवारी समोर येत आहेत ती माध्यमांकडेच आहेत ती मला माहित नाही असे उत्तर दिले.