Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईच्या इतिहासात प्रथमच 25 डिसेंबर रोजी समुद्र आरतीचे आयोजन करण्यात आले होते

मुंबईच्या इतिहासात प्रथमच 25 डिसेंबर रोजी समुद्र आरतीचे आयोजन करण्यात आले होते

हिंदू संस्कृती अद्वितीय आणि व्यापक आहे, येथे वृक्ष, वनस्पती, पक्षी, प्राणी, माती आणि पाणी यांच्या पूजेला पवित्र स्थान देण्यात आले आहे. 25 डिसेंबर रोजी वेदांत योगी श्री कालिकानंद सरस्वती जी, अरविंद मोहन नगर जी, दयानिधी शरण जी आणि सनातन  सेवा  न्यास चे  प्रेसिडेंट शिवोम  मिश्रा  जी यांनी समुद्र आरतीचे आयोजन केले होते. हे एक अतिशय आध्यात्मिक दृश्य होते ज्यात वैदिक मंत्र, प्रार्थना आणि पवित्र विधी समाविष्ट होत्या.

योगी कालिकानंद सरस्वती जी म्हणाले, “जेव्हा धार्मिक गुरु प्रार्थना करतात तेव्हा त्याचे आशीर्वाद संपूर्ण विश्वात पोहोचतात. भजन ही खरी भक्ती आहे. मुंबईने समुद्र प्रार्थनेसाठी हा दिवस निवडला याचा मला आनंद आहे. जय सनातन.”

हिंदू धर्मात, समुद्र प्रार्थनेला अतिशय शुभ मानले जाते, आणि समुद्राची पूजा करणे हे मानवाची आध्यात्मिक पातळी वाढवण्याचे एक साधन मानले जाते. यावेळी दरवर्षी 25 डिसेंबर हा समुद्र आरती दिन म्हणून साजरा करण्याचा ठरावही घेण्यात आला.

सुफी संत अरविंद नांगर जी म्हणाले की, मी भारतभर भ्रमण करेन आणि समुद्र महा आरती चे आयोजन  करेन जेणेकरून आपल्या देशबांधवांमध्ये शांतता आणि समृद्धी नांदावी आणि लोकांना समुद्राची धार्मिक विशालता समजावी. समुद्राला केवळ पर्यटन स्थळ न मानता धार्मिक भावनेने तो कसा स्वच्छ व सुंदर बनवला पाहिजे, याचीही माहिती ते देतील. मुंबईचा सर्वात मोठा भाग असलेल्या समुद्राचा आशीर्वाद घेण्यासाठी समुद्र पूजा केली जाते.”

जुहू चौपाटीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बरेच भाविक इथे भाजनामध्ये लिन होऊन समुद्र देवतेला प्रसन्न करण्याचा आनंद घेत होते। 

सुफी संत श्री अरविंद नगर जी म्हणाले, “समुद्र आरती करून येथे निर्माण झालेले वातावरण अप्रतिम होते. ख्रिसमस चा सांता कोण आहे हे सांगण्यासाठी मुलांना समुद्र किनाऱ्यावर फिरायला आणले जाते, परंतु समुद्राविषयी धार्मिक श्रद्धा आहेत हे कधीच सांगितले गेले नाही. मी “लोकांनी दरवर्षी 25 डिसेंबर हा समुद्र आरती दिवस म्हणून साजरा करावा अशी माझी इच्छा आहे. मी भारतभर प्रवास करीन आणि समुद्र प्रार्थना करेन जेणेकरून भारतातील लोकांमध्ये शांती, समृद्धी आणि सद्भावना नांदेल.”

योगी दयानिधी शरण म्हणाले, “एक धर्मगुरूया नात्याने सनातन धर्माच्या दिशेने माझे हे छोटेसे योगदान आहे. आणि हिंदू धर्माची विशाल संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचे काम आम्ही करू.”

या कार्यक्रमात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. मुंबईत होणारी ही पहिली समुद्र महाआरती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments