मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) निकाल जाहीर झाला. या परीक्षेत उस्मानाबादचा गिरीश बोडले राज्यातून पहिला आहे. गिरीशनं देशात विसावा क्रमांक पटकावलाय. देशात पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळवणारा तो महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी ठरला.
राज्यातील आठजणांनी पहिल्या १०० जणांमध्ये स्थान मिळवलंय. दिग्विजय बोडके (५४), सुयश चव्हाण (५६), भुवनेश पाटील (५९), पियुष साळुंखे (६३), रोहन जोशी (६७), राहुल शिंदे (९५), मयुर काटवटे (९६), वैदेही खरे (९९) या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत देशातील पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवलंय. यूपीएससी परीक्षेत राज्यातील अनेकांनी मोठं यश मिळवलंय. वल्लरी गायकवाड देशात १३१ वी आली. तर यतिन देशमुख (१५९), रोहन बापूराव घुगे (२४९), श्रीनिवास वेंकटराव पाटील (२७५), प्रतिक पाटील (३६६), विक्रांत मोरे (४३०), तेजस नंदलाल पवार (४३६) यांनीही परीक्षेत चांगलं यश मिळवलं.
यूपीएस्सीत उस्मानाबादचा गिरीश बडोले राज्यात पहिला
RELATED ARTICLES