मुंबई : शिवसेना भाजपमध्ये सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरु असताना महायुतीमधील घटक पक्ष रिपाइं,शिवसंग्राम, रासपा,रयत क्रांती संघटना या चारही घटक पक्षांना मंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे, रासपाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हे उपस्थितीत होते. आठ दिवस उलटूनही महायुतीकडे बहुमत असताना सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला नाही. विशेष म्हणजे शिवसेना भाजपात वाद सुरु असताना घटक पक्षांनी सत्तास्थापन होण्याआधीच चारही घटकपक्षांना मंत्रीपद देण्याची मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.
यावेळी आठवले यांनी महायुतीचंच सरकार स्थापन व्हावं अशी इच्छा यावेळी व्यक्त केली. शिवसेनेनं इतर विचार करु नये अशी इच्छा आठवले यांनी व्यक्त केली.