Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईफडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावरून उध्दव ठाकरे संतापले

फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून उध्दव ठाकरे संतापले

मुंबई : पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे चांगलेच संतापले. मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करायला नको होतं असं बैठकीत सांगितले.
मी मित्रपक्षाला मित्रपक्षच मानतो शत्रूपक्ष मानत नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं.
पत्रकारांना भाऊबीजेच्या दिवशी दिवाळी फराळानिमित्त वर्षावर बोलवण्यात आलं होतं. त्यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान आज शिवसेनेच्या बैठकीत माझं अमित शाह यांच्यासोबत जे काही ठरलं आहे ते करावं आम्ही स्थिर सरकार देऊ. मी मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही. मला खात्री आहे सगळं काही सुरळीत होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments