मुंबई : राज्यातील पेचप्रसंगावरून भाजपची कोंडी झाली आहे. शिवसेना आक्रमक झाल्यामुळे भाजपला सत्तास्थापन करण्यात अडचण निर्माण झाली आहे. या सर्व घ़डामोडींवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक सुरु आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांमध्ये बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत भाजपा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. निकाल लागून 13 दिवस उलटले तरी सुध्दा सत्तास्थापनेवरून युतीचा ताळमेळ बसला नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपा मित्र पक्ष असूनही शिवसेनेला साथ देणार नाही असेच सध्याचे चित्र आहे.