मुंबई: शिवसेना भाजपामध्ये पेच कायम असून, शिवसेनेचाचं मुख्यमंत्री होणार या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक आज गुरुवारी मातोश्रीवर होत आहे. या बैठकीत शिवसेना आमदारांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
भाजप सोबत कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जाणार नाही हे शिवसेननं स्पष्ट केल आहे. भाजपकडे 145 आमदार असतील तर त्यांनी सरकार स्थापन करावं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. अस संजय राऊत यांनी आज गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं. सत्तासंघर्षाला 14 दिवस उलटले असून युतीला कौल मिळाल्यानंतरही सरकार स्थापन झाल नाही. महाराष्ट्रातील तेराव्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपणार आहे. तोपर्यंत नवे सरकार अस्तित्वात येऊन हंगामी अधिवेशन होण्याची गरज आहे. अन्यथा राष्ट्रपती राजवटीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शिवसेनेने डावपेच आखायला सुरुवात केली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज शिवसेना आमदरांची मातोश्रीवर होणा-या बैठकीकडे विशेष महत्व प्राप्त झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या नजराही शिवसेनेच्या या बैठकीकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.