मुंबई: भाजप सत्तेचा गैर वापर करत असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदरांना फोडण्यासाठी आमिष दाखवलं असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
पाटील एका वृत्तावाहिनीशी बोलत असताना आमदारांना आमिष दाखवण्याचा व फोडण्या बाबत दावा केला. आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फूटणार नाही. भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली होती.
पाटील म्हणाले की, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार फूटला तर त्याच्या विरोधात तिन्ही पक्ष एकच उमेदवार देऊन त्याचा पोटनिवडणुकीत पराभव करतील. असा इशाराही दिला आहे. कोणताही आमदार फूटणार नाही असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.