मुंबई : संभाजी भिडे यांना अटक होत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. कोरेगाव- भिमा हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आज एल्गार रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संभाजी ब्रिगेडने समर्थन दिलं आहे.
एल्गार रॅलीत सहभागी झालेले श्रीमंत कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संभाजी भिडेंना अटक न करण्याच्या षडयंत्रामागे मुख्यमंत्र्यांचा हात असल्याच्या संशयाला वाव आहे, असं कोकाटे म्हणाले. त्यामुळे संभाजी भिडेंना अटक होत नसेल, तर मुख्यमंत्र्यांना अटक केली पाहिले, अशी मागणी श्रीमंत कोकाटेंनी केली आहे. देऊनही सरकार भिडेंना पाठीशी घालतंय. शिवाय आंबेडकरी जनतेला दडपण्यासाठी पोलिसांच्या बळाचा वापर केला जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
भिडेंना अटक होत नसेल तर मुख्यमंत्र्यांना अटक करा : कोकाटे
RELATED ARTICLES