मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारच्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत. हातावर अलगीकरणाचा शिक्का असतानाही सहा प्रवासी एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत असल्याची घटना समोर आली आहे. या सर्वांनी मुंबई सेंट्रल स्थानकातून प्रवास सुरु केला होता. वडोदरला जाण्यासाठी ते निघाले होते. मात्र ऐनवेळी इतर प्रवाशांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने या सहा जणांना बोरिवली स्थानकात उतरवण्यात आलं.
हातावर अलगीकरणाचा शिक्का असतानाही सहा प्रवाशांनी मुंबई सेंट्रल स्थानकातून प्रवास सुरु केला होता. वडोदरला जाण्यासाठी ते निघाले ऐनवेळी इतर प्रवाशांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने या सहा जणांना बोरिवली स्थानकात उतरवण्यात आलं. हे सर्वजण सिंगापूरहून परतले होते. या सर्वांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का मारण्यात आला होता. या सर्वांना आपल्या घरातच थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही हे सर्वजण वडोदराला जाण्यासाठी निघाले होते. मुंबई सेंट्रलला त्यांनी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सौराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास सुरु केला होता. पण ही बाब लक्षात येताच सर्वांना बोरिवली स्थानकात उतरवण्यात आलं. सरकारकडून वारंवार आवाहन करुनही नागरिक काळजी घेतांना दिसत नाही.
बाहेरून येणारे लोक आपलेच, पण काळजी घ्या…
बाहेरच्या देशातून जे लोक येत आहेत ते आपलेच आहेत. कुणाचा मुलगा असेल, काका, मामा असतील त्यांच्यासाठी आपले दरवाजे उघडेच आहेत. पण परदेशातून आल्यानंतर दिलेल्या सूचना पाळा. हातावर शिक्का मारलेले लोक इकडे तिकडे फिरत आहेत. आपली माहिती लपवत आहेत. हे योग्य नाही. अशी खंतही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली होती.