मुंबई : आज मुंबईत आलेल्या निर्मला सीतारामन आल्या असून, भाजपाच्या नरिमन पॉईंटमधील कार्यालयात जात होत्या. त्यावेळी पीएमसी बँकेच्या संतप्त ग्राहकांनी घेराव घातला. पैशाबाबत जाब विचारला.
पंजाब महाराष्ट्र बँकेच्या खातेधार संतप्त झाले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेराव घातल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. आर्थिक अनियमितता असल्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध उठवण्याच्या मागणीसाठी बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्र्यांसमोर आंदोलन केलं.
पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या ग्राहकांशी सीतारामन यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. आज संध्याकाळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याशी बोलून ग्राहकांना होणाऱ्या त्रासाची माहिती त्यांना देईन, असं सीतारामन म्हणाल्या. ग्राहकांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी त्यांना विनंती करेन, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. मात्र, ग्राहाकांधील संताप काही कमी झाला नाही.
Maharashtra: Finance Minister Nirmala Sitharaman met the depositors of Punjab and Maharashtra Co-operative (PMC) Bank in Mumbai today. pic.twitter.com/PVekascl5U
— ANI (@ANI) October 10, 2019