Placeholder canvas
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसेच्या पराभूत शिलेदारांच कृष्णकुंजवर आत्मचिंतन!

मनसेच्या पराभूत शिलेदारांच कृष्णकुंजवर आत्मचिंतन!

Raj Thackeray mns
मुंबई : मनसेला विधानसभा निवडणुकीत जोरदार धक्का बसला. सर्व शिलेदारांची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी बैठकीत आत्मचिंतनही करण्यात येणार आहे.

मनसेने १०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील एकमेव आमदार निवडूण आले. राजू पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा पराभव केला. परंतु, मनसेला या निवडणुकीत त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.

अनेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी मनसेच्या उमेदवारांनी काँटे की टक्कर दिल्याचं पहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी तर मनसेचे उमेदवार पराभूत होऊनही दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पहायला मिळालं होतं. दरम्यान, राज ठाकरे आज सर्व उमेदवारांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या शिलेदारांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments