मुंबई : शिवसेना भाजपामध्ये सत्तेचा गुंता कायम असताना आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांशी भेट घेतली. सरकार स्थापनेत शिवसेना अडथळा ठरत नाही. त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं. अशी इच्छा व्यक्त केली. असे संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटावा म्हणून एकीकडं वेगवान हालचाली होत असताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले, “ही एक सदिच्छा भेट होती. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही आमची भूमिका मांडली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एक पुस्तक दिलं होतं तो पुस्तक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला. सरकार कोणी स्थापन करावं कधी करावं, राज्यपाल हे मोठ्या पक्षालाच बोलवणार. तो निर्णय त्यांचा आहे. त्यांना आम्ही सल्ला देऊ शकत नाही असेही संजय राऊत यांनी सांगितले.