मुंबई : राज्यात भाजपचं नव्हे तर शिवसेनेचंच सरकार येणार आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी केला.
राज्यात युतीमध्ये सत्तेच्या समसमान वाटपावरून पेच कायम असताना राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष पाटील यांनी शिवसेने बाबत जे भाकीत केलं त्यावरून राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे. भाजपने शिवसेनेचे आमदार फोडल्यास पोटनिवडणुकीत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊन त्यांचे उमेदवार पुन्हा निवडून आणू, असं पाटील यांनी सांगितलं.
राज्यात शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणार असल्याचे संकेत मिळत असून राज्यातील राजकीय समीकरणेही बदलणार असल्याचं बोललं जात आहे.