Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईऐरोलीतून गणेश नाईक लढणार;संजीव नाईकांची माघार!

ऐरोलीतून गणेश नाईक लढणार;संजीव नाईकांची माघार!

Ganesh Naikनवी मुंबई : ऐरोली मतदारसंघातून माजी मंत्री गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईक यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आज संजीव नाईक यांनी माघार घेतली. आता गणेश नाईक ऐरोलीतून लढणार असून त्यांना भाजपाकडून एबी फॉर्म देण्यात आले.

गणेश नाईकसह त्यांच्या कुटुंबियांनी आणि राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल होता. नाईक हे दोन तिकीटासाठी प्रयत्न करत होते मात्र, भाजपाने दोन तिकीट देण्यास नकार दिला. सुरुवातीला संजीव नाईक यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाईक कुटुंबियांमध्ये नाराजी होती. त्यामुळे संजीव नाईक यांनी माघार घेतली व वडिल गणेश नाईकांचे नाव पुढे केले. कार्यकर्त्यांची इच्छा होती की, गणेश नाईक यांनीच निवडणूक लढवा यासाठी माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना नंतर राष्ट्रवादी असा प्रवास करुन भाजपावासी झालेल्या नाईकांसाठी ही लढाई सोपी नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments