मुंबई: भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्ली दरबारी बैठक सुरु झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होत आहे. या बैठकीत कोणत्या उमेदवारांना तिकीट द्याचं आणि कुणाचा पत्ता कापायंच हे ठरणार आहे. यासाठी जोरदार खलबते सुरु आहेत.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, पंकजा मुंडे या नेत्यांचाही बैठकीतही समावेश आहे. विशेष म्हणजे 30 विद्यमान आमदारांचे पत्ते कट होणार आहेत. तर नवीन चेह-यांना संधी मिळणार आहेत. अशीही माहिती समोर येत आहे.
शिवसेना-भाजपा युतीमध्ये जागावाटप कसे केले जाईल यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या बैठकीकडे मित्र पक्ष शिवसेनेचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे भाजपाच राज्यातील नेते 288 नावांची यादी घेऊन दिल्लीला गेले आहेत, त्यामुळे भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारी आहेत. त्या दृष्टीकोणातूनही या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.