मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कामांना एकामागून एक दणके देण्याचे काम सुरु आहे. आघाडी सरकारने सिंचन प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारने आता भाजपा सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे बरेच घोटाळे बाहेर निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे त्यामध्ये ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरवणे, कोकण पर्यटन विकास कार्यक्रम, यात्रास्थळाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या विकास यांचा समावेश आहे. २०१९-२० मध्ये मंजूर करण्यात आलेल्या अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात न आलेल्या या विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. या कामांना दोन कोटींपासून ते २५ कोटींपर्यंत अनुदान मिळालं होतं.
ग्रामीण भागातील विकासकामांचा यामध्ये समावेश असून यासाठी अनुदानही मिळालं होतं. त्यामुळे या सर्व कामांमध्ये घोटाळे झाले का याही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.