उन्नाव (उत्तर प्रदेश) : हैदराबामधील महिला डॉक्टरला बलात्कारानंतर जाळून मारल्याची घटना ताजी असताना उन्नावमध्ये एका सामूहिक बलात्कार पीडितेला पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना आज गुरुवारी पहाटे चार वाजता घडली.
या घटनेमुळे उन्नाव पुन्हा हादरले आहे. पीडितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, पीडिता आज गुरुवारी पहाटे चार वाजता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात असताना ही घटना घडली. गौरा फाट्यावर गावातील हरिशंकर त्रिवेदी, किशोर शुभम, शिवम, उमेश यांनी पीडितेला घेरले आणि तिच्या डोक्यावर काठी आणि गळ्यावर चाकूने वार केले. दरम्यान, चक्कर आल्याने पीडिता खाली कोसळली. त्यानंतर या सहा जणांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, अशी माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास रायबरेली पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचा हे आरोपी जामिनावर सुटले आहेत.
उन्नाव पीड़िता के स्वास्थ्य समाचार से मन आहत है। ईश्वर से प्रार्थना है कि पीड़िता जल्द स्वस्थ हो।
कल भाजपा सरकार का बयान था यूपी में सब ठीक है। आज एक बयान और आया। लेकिन क़ानून व्यवस्था के बारे में झूठी बयानबाज़ी व झूठा प्रचार करने की ज़िम्मेदारी CM और उप्र सरकार की ही है।#Unnao
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 5, 2019
ही घटना घडल्यानंतर तत्काळ पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. पालिसांनी आरोपींच्या घरांवर छापेमारी केल्यानंतर हे सर्व आरोपी आपापल्या कुटुंबीयांसोबत आपल्या घरातच होते.
प्रियांका गांधींचा हल्लाबोल…
या प्रकरणावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर हल्लबोल केला. बुधवारी गृहमंत्री अमित शहा आणि आज गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे खोटे बोलले आहेत. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली झाली असल्याचे ते म्हणाले. दररोज अशा प्रकारच्या घटना घडताना पाहून संताप येतो. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता खोट्या प्रचारातून बाहेर पडायला हवे, असे प्रियांका गांधी यांनी ट्विटवरून जोरदार टीका केली.