मुंबई : कोरोनामुळे काळजी घेण्याची गरज आहे. मंदिर, मशीद, चर्च व इतर सर्व धार्मिक स्थळांवर गर्दी टाळावी अशी मी राज्याच्या जनतेला विनंती करतो. याबाबत सर्व धर्मगुरुंनीही काळजी घ्यावी. असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केले.
अद्यापही रेल्वे, बससेवा बंद करण्यात आली नाही. सर्व शाळा, मॉल बंद करण्यात आल्या आहेत. हे जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. सर्व यात्रा, राजकीय कार्यक्रम टाळले पाहिजेत. कारण पुढचे पंधरा दिवस महत्वाचे आहेत. असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.