मुंबई : गुजरात निवडणूक निकालावरुन शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. निवडणूक निकालाचे कल पाहाता गुजरातमधील जनता भाजपवर नाराज असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली आहे. १८२ पैकी भाजपला ९९ तर काँग्रेसला ८० जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपने १५० जागांचे लक्ष्य ठेवलं होतं. पण अद्याप भापला हा आकडा गाठता आलेला नाही. यावरुनच शिवेसना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की, “गुजरातच्या विकास मॉडेलचा दाखला देत, भाजप देशात सत्तेत आली. पण निकालावरुन, गुजरातमधील जनता भाजपवर खुश नसेल, तर याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.”ते पुढे म्हणाले की, “देशाची सुरक्षा, काश्मीर मुद्दा, नोटाबंदी, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे.”
गुजरातमधील जनता भाजपवर नाराज- संजय राऊत
RELATED ARTICLES