Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणतरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला बेड्या

तरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला बेड्या

ठाणे : अंबरनाथ-टिटवाळा रस्त्यावर तरुणाची हत्या करुन तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. संजय नरवडे (३०)रा.उल्हासनगर असे आरोपीचे नाव आहे. तो रिक्षा ड्रायव्हर आहे. पैशाच्या हव्यासाने चोरी केली, तर तरुणीविषयी आकर्षण वाटल्यामुळे बलात्कार केला, अशी धक्कादायक कबुली आरोपीने दिली.
ठाणे गुन्हे शाखेने कारवाई केली. संजयला उद्या दुपारी एक वाजता कल्याण सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.  संजय याने यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का? याचाही तपास पोलिस करत आहेत.

प्रेमी युगुल एकांताचा घेतात फायदा….
अंबरनाथहून नालिंबीमार्गे टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगरदऱ्या आणि भयाण शांतता. याचाच फायदा उचलत प्रेमी युगुल हे इकडे गर्दी करतात. प्रेमी युगुलांसाठी हा अड्डा जीवघेणा बनत चालला आहे.

एकांत मिळवण्यासाठी या रस्त्यात भरपूर जागा असल्यानं अंबरनाथ आणि परिसरातून अनेक प्रेमी युगुलं इथं येतात आणि झाडाझुडपात, खोल दऱ्यांमध्येही उतरुन बसतात. मात्र हाच प्रकार एका तरुणाच्या जीवावर बेतला.

तो तरुण चायनिजच्या दुकानात होता कामाला

मूळचा शहापूरचा असलेला आणि अंबरनाथला चायनिजच्या दुकानात काम करणारा गणेश दिनकर हा कल्याणला राहणाऱ्या तरुणीसोबत रस्त्याच्या बाजूच्या झाडाच्या आडोशाला बसला होता. मात्र तिथे अचानक आलेल्या दोन लुटारुंनी त्याच्याकडे गाडीची चावी आणि पैसे मागितले. त्याला गणेशने नकार देताच त्याच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीवर बलात्कार करुन त्याची गाडी घेऊन चोरटे निघून गेले. या सगळ्या घटनेनं या परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पिस्तुलचा वापरणारे पोलिस होते हैराण
प्रियकराला मारण्यासाठी चोरट्यांनी पिस्तुलाचा वापर केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली. चोरटे हे स्थानिक गर्दुल्ले किंवा लुटारु असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती, मात्र स्थानिक लुटारुंकडे महागडी पिस्तुल आली कुठून? हा प्रश्न उपस्थित झाला होता.

पण कुणी तक्रारीसाठी येईना

गणेशप्रमाणेच अनेक प्रेमवीर एकांत मिळवण्यासाठी या भागात येतात. त्यापैकी अनेकांसोबत अशा लूटमारीच्या किंवा अत्याचाराच्या घटना घडल्या असतील. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आजवर अशी एकही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. कारण एकच, ते म्हणजे समाजात होणारी बदनामी. मात्र आशा घटना कुणासोबत घडल्या असतील, तर त्यांनी न घाबरता पुढे यावं, तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल, असं आवाहन ठाणे पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments