skip to content
Friday, May 17, 2024
Homeदेशयुतीला जनतेनं कौल दिलं, त्यांनी सरकार स्थापन करावं : शरद पवार

युतीला जनतेनं कौल दिलं, त्यांनी सरकार स्थापन करावं : शरद पवार

Sharad pawar shivsena cmदिल्ली : शिवसेना भाजपला मतदारांनी कौल दिलं त्यांनी सरकार स्थापन करावे. आमच्याकडे सत्ता स्थापन करण्याचा आकडा नाही. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. त्यांनी आम्हाला विचारलं नाही. सेना भाजपमधील अतंर्गत वाद आहे. आम्ही शिवसेना भाजपच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच नाही असेही पवार यांनी सांगितले. आमच्याकडे बहुमतं असतं तर ही वेळ आली नसती असेही पवार यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी राज्याच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. पुन्हा मुंबईत राज्याच्या नेत्यांशी चर्चा करुन दिल्लीला परत येईल. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करेल असेही पवारांनी सांगितले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मी नेहमी भेटत असतो. असंही पवारांनी सांगितलं त्यामुळे सध्यातरी सर्वकाही सस्पेन्स आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments