Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रकोणत्याही समाज, धर्माच्या नागरिकांच्या हक्काला धक्का लावू देणार नाही : उध्दव ठाकरे

कोणत्याही समाज, धर्माच्या नागरिकांच्या हक्काला धक्का लावू देणार नाही : उध्दव ठाकरे

Uddhav Thackeray: No support for Citizenship Bill until Shiv Sena's questions answered

नागपूर : देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे (CAA). मात्र, या कायद्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात दिलं.

“सर्वोच्च न्यायालयात हा कायदा योग्य की अयोग्य याबाबतचा निर्णय व्हायचा आहे. मी अनेकांशी बोलत आहे. मला भेटल्यानंतर अनेकांचे गैरसमज दूर होत आहेत. कोणत्याही समाजातील नागरिकाने भीती, गैरसमज बाळगू नये. महाराष्ट्रातील सलोखा कायम ठेवा. महाराष्ट्र देशाला एक नवी दिशा देत आहे, यामध्ये जो कोणी विष कालवण्याचं काम करत आहेत, त्याला बळी पडू नका”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

आंदोलन करायचे जरूर करा – मुख्यमंत्री

लोकशाही मध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन,मोर्चे जरुर काढा परंतु शांततेच्या मार्गाने करा. जर मला निवेदन द्यायचे असतील तर जरुर या. मला भेटण्याची इच्छा असेल तर भेटू शकता असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments