नवी दिल्ली/पुणे – कोरेगाव-भिमा प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना दिलासा मिळाला आहे. त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला. तसेच त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत अंतरीम सुरक्षाही देण्यात आली आहे.
यापूर्वी मिलिंद एकबोटे यांची अटकपूर्व जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लोबंकळत होती.एवढेच नाही, तर मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंटदेखील जारी केले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत दिलासा दिला आहे.