नवी दिल्ली : दिल्ली येथे सुरु असलेल्या ‘हुनर हाट’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. मोदींनी ‘लिट्टी चोखा’ चा आस्वाद घेतला. त्यानंतर ते फोटो ट्विट केले. त्यावर बिहारचे माजी मंत्री लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यांनी ट्विट करुन मोदींची फिरकी घेतली.
तेज प्रताप यांनी पंतप्रधान मोदींच्या ट्विटला रिट्वीट केले. ‘कतनो खईबऽ लिट्टी चोखा, बिहार ना भुली राउर धोखा..!’ भोजपुरी भाषेमध्ये हल्लाबोल केला. याचा अर्थ तुम्ही कितीही लिट्टी चोखा खा परंतु बिहारला जो धोखा दिला तो कुणीही विसरणार नाही. असा इशारा दिला.
कतनो खईबऽ लिट्टी चोखा, बिहार ना भुली राउर धोखा..! https://t.co/eM80wtlYla
— Tej Pratap Yadav (@TejYadav14) February 19, 2020
पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीच्या राजघाट येथे सुरु असलेल्या ‘हुनर हाट’ ला भेट दिली. लिट्टी चोखा चा आस्वाद घेतांनाचे फोटो ट्विट केले होते. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका सुरु झाली. बिहार निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदीं सर्व काही करत असल्याची टीका सुरु झाली.
दिल्लीमध्ये भाजपला सपाटून मार खावा लागला. २२ वर्ष भाजपा दिल्लीमध्ये सत्तेबाहेर असणार आहे. बिहारमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणूका होणार आहेत. भाजप आणि जेडीयू हे युती करुनच निवडणूक लढणार आहेत.
बिहार विधानसभा डोळ्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिट्टी चोखा चा आस्वाद घेऊन बिहारच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. अशी जोरदार टीका सोशल मीडियावर सुरु झाली आहे.