Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईफडणवीसांना आता दुसरं काही काम आहे का? : जयंत पाटील

फडणवीसांना आता दुसरं काही काम आहे का? : जयंत पाटील

Respect for Pawar Saheb, come back, Jayant Patil appeals to Ajit Pawar via Twitterमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार लवकरच खातेवाटप करणार आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, फडणवीस म्हणतात तसं थोड्या दिवसांच हे सरकार थोडंथोडं करून पाच वर्षे पूर्ण करणार आहे. तसेच, फडणवीस यांना आता दुसरं काही काम आहे का? ते बिचारे आता असं करणारचं त्यांच्या सोबत आमची सहानुभूती आहे. असा टोला राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे.

आज बुधवारी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची बैठक पार पडली. त्यानंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमची जी बैठक होती ती जीएसटी आणि राज्याचे स्त्रोत कसे वाढवायचे यासंदर्भात होती. खातेवाटप जाहीर करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, मुख्यमंत्री ते लवकरच जाहीर करतील, असं यावेळी जयंत पाटील म्हणाले. सरकारवर विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रतित्युत्तर देताना, जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना दुसरं काही काम आहे का? ते बिचारे असं करणारच, माझी त्यांना संपूर्ण सहानुभूती आहे. ते म्हणतात तसं थोड्यादिवसाचं सरकार थोडंथोडं करून पाच वर्षे पूर्ण करणार आहे. असंही जयंत पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments