मुंबई : राज्यातील सत्तापेच बुधवारी संपणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी बहुमत चाचणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सुध्दा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मु्ख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाआघाडीच्या सर्वच नेत्यांनी फडणवीसांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता आहे. उद्या बहुमत चाचणीसाठी सामोरे जाणार आहे.