skip to content
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजन‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता गोविंदा!

‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता गोविंदा!

बॉलिवूडमध्ये चीची नावाने ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा याचा आज (२१ डिसेंबर) वाढदिवस. २१ डिसेंबर १९६३ रोजी मुंबईत जन्मलेला गोविंदा एकेकाळचा नंबर वन स्टार होता. आजघडीला गोविंदाची बॉलिवूडमध्ये ती क्रेझ राहिलेली नाही.पण एकेकाळी याच गोविंदावर प्रेक्षक फिदा होते. त्याचे चिरपरिचित हास्य आणि त्याच्या अनोख्या नृत्य शैलीने अनेकांना वेड लावले होते.

गोविंदाची पत्नी सुनीता

गोविंदा हिरो म्हणून जितका प्रसिद्ध होता तितकेच त्याचे अफेअरही चर्चेत राहिले. एक वेळ अशीही आली की, या अफेअरमुळे त्यांचा संसार डावावर लागला होता. आज आम्ही  गोविंदाच्या लव्ह लाईफचे काही गाजलेले किस्से तुम्हाला सांगणार आहोत.

८० व ९० च्या दशकात गोविंदा अभिनेत्री नीलम हिच्या प्रेमात आकंठ बुडला होता. पडद्यावर या दोघांची जोडी प्रचंड गाजली होती. या जोडीने डझनावर सिनेमे केलेत. ‘इल्जाम’च्या सेटवर गोविंदा व नीलम यांची पहिल्यांदा भेट झाली होती. दोघांचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला आणि याचदरम्यान नीलम व गोविंदा एकमेकांच्या जवळ आलेत. गोविंदा नीलमवर इतके प्रेम करायचा की, तिला कुण्या दुस-या हिरोसोबतही पाहू शकत नव्हता. तिच्यासोबत लग्न करण्याची गोविंदाची इच्छा होती. पण गोविंदाच्या आईला हे नाते मान्य नव्हते. तिने गोविंदासाठी दिग्दर्शक अनिल सिंहची साळी सुनीता (गोविंदाची पत्नी) हिला पसंत केले होते. आईच्या इच्छेखातर अखेर गोविंदाने सुनीतासोबत लग्न केले. एका मुलाखतीत गोविंदाने सांगितले होते की, तो नीलमवर पे्रम करायचा आणि सुनीताशी फ्लर्ट. लग्नानंतरही गोविंदा नीलमसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्याने नीलमपासून हे लग्न लपवून ठेवली होते. पण एकदिवस नीलमला कळले आणि तिने गोविंदासोबतचे सगळे नातेसंबंध संपवून टाकले.

यानंतर अनेक वर्षांनी गोविंदाच्या आयुष्यात राणी मुखर्जी आली. ‘हद कर दी’च्या सेटवर गोविंदा आणि राणी जवळ आलेत. दोघांनाही प्रेम झाले. राणी सुद्धा गोविंदाच्या प्रेमात वेडी झाली होती. याकाळात गोविंदाने राणीवर बराच पैसा उधळला, असे म्हटले जाते. तो तिला महागड्या गाड्या, हिरे, दागिणे गिफ्ट द्यायचा. एकदा राणीच्या फ्लॅटमधून तो अर्धनग्न अवस्थेत बाहेर पडताना दिसला होता. राणीला गोविंदासोबत लग्न करायचे होते. पण गोविंदाचे लग्न आधीच झाले होते. तो दोन मुलांचा पिता होता. सुनीताला गोविंदाच्या या अफेअरबद्दल कळले तेव्हा ती दोन मुलांना घेऊन घर सोडून निघून गेली होती. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. सुनीताने राणीला फोन करून धमकी दिली होती, असेही कळते. गोविंदा पत्नी व मुलांना सोडायला तयार नव्हता. त्यामुळे राणीनेत्याच्यासोबतचे सगळे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments