पुणे : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्ली येथे विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून पुणे येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे सोमवारी सर्व शाळा महाविद्याले बंद ठेवली जाणार आहेत.
सध्या देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून गदारोळ सुरु आहे. ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे, धरणे सुरु आहेत. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या आहेत. दिल्ली येथे जामिया मिलीयाच्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ बंद ठेवण्यात येणार आहे. यापूर्वीही मुंबई, पुणे, औरंगाबाद तसेच ठिकठिकाणी विद्यार्थी संघटनांनी निदर्शने केली होती.