skip to content
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रतरूणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योगातून रोजगार निर्मिती करावी - सामाजिक न्याय...

तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योगातून रोजगार निर्मिती करावी – सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे

प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत कार्यरत व्यवसाय प्रशिक्षण संस्थांनी विविध क्षेत्रात युवकांना प्रशिक्षण देवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. उद्योगाची नवनवीन क्षेत्रे निर्माण होत असून युवकांनी नव्या वाटा शोधाव्यात व नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. कौशल्य प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर कोणत्याही ठिकाणी काम करत असताना आपल्यामधील कौशल्य वापरण्याची जिद्द व मनाची तयारी पाहिजे. तरूणांनी नव्या वाटा शोधत फक्त नोकरीच्या मागे न धावता स्वत:चा उद्योग उभारून रोजगार निर्मिती करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगीता खोत, करिअर मार्गदर्शक डॉ. संदीप पाटील, महानगरपालिकेचे प्रकल्प व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक एस. के. माळी, पुणे विभागाचे मार्गदर्शन अधिकारी सागर मोहिते, उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आयुब तांबोळी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सर्जेराव पाटील, गुरूकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन व्हनखंडे, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अशासकीय सदस्य स्वप्नील शहा आदि मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, उद्योग उभारणीसाठी मुद्रा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील योजनेमधूनही कर्ज वितरीत करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेऊन अधिकाधिक उद्योग सुरू करावेत. कष्ट व मेहनत केल्यास निश्चितच यश मिळेल. उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, विविध योजनांच्या माध्यमातून पैसा उपलब्ध आहे. त्यासाठी फक्त हिम्मत आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देवून उद्योग उभा करण्याबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी स्वानुभव कथन केले.

यावेळी महापौर संगीता खोत, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अशासकीय सदस्य स्वप्नील शहा यांनी मार्गदर्शन केले. तसेच, डॉ. संदीप पाटील यांचे कौशल्य विकासातून करिअर संधी या विषयावर व्याख्यान झाले.

यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील व्याज परतावा मिळालेल्या लाभार्थींचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. या महामंडळाच्या योजनांची महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सर्जेराव पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.

यावेळी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत सर्वाधिक रोजगार प्राप्त करून देणाऱ्या कार्यरत व्यवसाय प्रशिक्षण संस्थांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांक प्राप्त ग्रीक्स, स्पंदन कॉम्प्युटर इन्स्टिट्युट मिरज, व्दितीय क्रमांक रिसोर्स ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटर एज्युकेशन सोसायटी मिरज, तृतीय क्रमांक प्राप्त प्राप्त लियाड इन्स्टिट्युट ऑफ आर्ट ॲन्ड डिझाईन सांगली या प्रशिक्षण संस्थांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच श्रीयश एज्युकेशन ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युट मिरज व ग्रीक्स, करिअर पॉईंट कॉम्प्युटर अकॅडमी सांगली या प्रशिक्षण संस्थांना प्रोत्साहनात्मक प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी विविध प्रशिक्षण संस्थांनी त्यांच्या संस्थेकडून कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करून रोजगार प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या यशोगाथांचे सादरीकरण केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गणेश वंदन नृत्यासह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

प्रास्ताविकात सहाय्यक संचालक एस. के. माळी यांनी जागतिक कौशल्य दिनाचा हेतू सांगून युवकांनी विविध प्रशिक्षण संस्थाव्दारे चांगले कौशल्य आत्मसात करून याचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी करावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. आभार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आयुब तांबोळी यांनी मानले.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे सदस्य, विविध प्रशिक्षण संस्थांचे संचालक, प्रतिनिधी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी, प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

15 जुलै रोजी देशात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. चंद्रपूरमध्ये विविध मार्गदर्शक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचे औचित्य साधून बोलतांना ते म्हणाले, या दिनी फक्त कार्यक्रम आयोजित करून जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याचा दिवस नाही. तर देशातील युवकांनी स्वतःमध्ये कौशल्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून संकल्प करण्याचा हा दिवस आहे. भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असा इतिहासात उल्लेख आहे. 1750 मध्ये जगाच्या एकूण उत्पन्नापैकी एकट्या भारत देशाचे उत्पन्न 50 टक्के होते. परंतु आज गरजेच्या अनेक वस्तू परदेशातून आयात कराव्या लागतात. कारण युवकांना स्वतःचे कौशल्य ओळखता आलं नाही. म्हणून आजही आपला देश निर्मिती व निर्यातीमध्ये मागे आहे. आपल्या युवकांमध्ये शक्ती आहे, परंतु त्या शक्तीला कौशल्याची जोड देण्याची गरज असून त्याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून कौशल्य भारत योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील युवकांनी घ्यावा व कौशल्य निर्माण करून स्वतःसोबतच देशाचाही विकास साधावा. हाच खरा भारत मातेचा जयजयकार असेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना युवकांमध्ये कौशल्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून तसेच उद्योजकता निर्माण होण्याकरिता निधीची तरतूद केलेली आहे. पोंभूर्णा येथे अगरबत्ती तसेच टूथपिक निर्मितीचा उद्योग सुरू केलेला असून या माध्यमातून जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. जिल्ह्यात सैनिकी शाळेची निर्मिती करण्यात आलेली असून भविष्यात राष्ट्राचा लष्करप्रमुख या शाळेतून शिकलेला असेल तेव्हा सर्वांची छाती अभिमानाने फुलून येईल. जिल्ह्यात वनसंपत्ती, खनिज संपत्ती व कृषी संपत्तीची कमतरता नसून त्या आधारित उद्योगांची कमतरता आहे. हे ओळखूनच चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. त्यामुळे बांबूवर आधारित उद्योग करणाऱ्या महिला तसेच युवकांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होणार आहे. उत्पादनाच्या क्लस्टर पद्धतीचा शोध भारत देशामध्येच लागला असून त्याचे महत्त्व तरुणांनी ओळखावे. तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक बाबींसाठी करावा. जग बदलाची तसेच देश बदलाची वाट न पाहता बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी आणि जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित युवकांना दिल्या.

नोव्हेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. आपल्या देशात 2015 पासून हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रशासकीय भवन ते प्रियदर्शनी सभागृहापर्यंत मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. उपरवाही येथिल स्किल अँड इंटरप्रीनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट व ब्रह्मपुरी येथील एकलव्य भटक्या मागासवर्गीय संस्थेमार्फत पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे उपस्थित युवांमध्ये उद्योग संबंधित शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. सोबतच विविध तज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे यांनी कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन केले. नरेश उगेमुगे यांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचा विकास या विषयावर तर राहुल ठाकरे यांनी महाराष्ट्र हिरकणी योजना व कृषीआधारीत उद्योग याचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बल्लारपूर येथील डायमंड कटींग सेन्टरच्या माध्यमातून हि-याला पैलू पाडणाऱ्या कौशल्य विकासाचे प्रात्याक्षिकही युवकांनी अनुभवले. या केंद्राचे संचालक निलेश गुल्हाने यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी कौशल्य विकासामध्ये कार्य करणाऱ्या अग्रणी संस्थांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी तसेच कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी व विद्यार्थी तसेच युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments