Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रकोल्हापूरराज्यातील १६ मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले!

राज्यातील १६ मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले!

कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. या भ्रष्ट मंत्र्यांविरोधात सभागृहात पुरावे दिले आहेत. अशा घोटाळेबाज मंत्र्यांना एक मिनिटभरही खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना खुर्चीवरून पायउतार करावे, असे आवाहन करतानाच जर मी दिलेले पुरावे खोटे असतील तर कुठल्याही चौकात फाशी घ्यायला मी तयार आहे असे आव्हान विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

‘कॅग’च्या अहवालातही राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. तूरडाळ खरेदीत २५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्याचा अधिकार नाही. ज्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं, डाळ खरेदीत डल्ला मारला ते सुभाष देशमुख, राष्ट्रवादीवर कुठल्या तोंडाने टीका करत आहेत असा टोलाही मुंडे यांनी लगावला. सहकारमंत्री देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाची डल्ला मारणारे हल्लाबोल करत आहेत, अशा शब्दांत खिल्ली उडविली होती. त्याला मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments