शिवसेना भाजपा युतीमधील सत्तासंघर्षामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेनं आडमुठेपणीची भूमिका सोडावी सत्ता स्थापन करावी अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीला दिली.
शिवसेनेनं काँग्रेस आघाडीच पाठिंबा घेतला तर ते सरकार जास्त दिवस टिकणार नाही अशीही टीका आठवले यांनी केली. जनतेनं युतीला कौल दिला आहे. जनमताचा आदर करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊ नये. असंही आठवले म्हणाले.
शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदा हट्ट सोडून दयावा. उपमुख्यमंत्रीपद घेऊन टाकावे. शिवसेना जर सोबत आली नाही तर भाजपा आम्ही मित्र पक्ष अल्पमताचं सरकार स्थापन करु. व ते सरकार पाच वर्ष चालवू असेही आठवले म्हणाले.