Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबाद हिंसाचारावरून शिवसेना-एमआयएमची एकमेकांवर चिखलफेक

औरंगाबाद हिंसाचारावरून शिवसेना-एमआयएमची एकमेकांवर चिखलफेक

औरंगाबाद : शुल्लक कारणावरून उफाळलेल्या हिंसाचारावरून आता शिवसेना व एमआयएममध्ये आरोपप्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. ही दंगल शिवसेनेने घडवून आणली असा आरोप एमआयएमने केला आहे. तर, दंगलीमागे एमआयएमचा हात असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे.

औरंगाबादमधील दंगल पूर्वनियोजित होती. हिंदूंचे रक्षण करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दंगलखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. तर, ही दंगल घडवण्यामागे शिवसेनेचा हात असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी दगडफेक करत असतानाचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. सरकारला थोडी जरी लाज असेल तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असेही जलील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments