मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर आता नारायण राणे पश्चिम महाराष्ट्रात तीन दिवस दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर राणेंनी महाराष्ट्रातल्या विविध भागांचा दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आमदारकीसाठी आठ महिने वाट बघावी लागणार आहे. तो पर्यंत दौऱ्यांशिवाय राणे यांच्याकडे कोणतही काम नाही.
८, ९, १० डिसेंबर असा हा तीन दिवसांचा दौरा असेल. यात सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत. नवीन पक्षाची स्थापना झाल्यानंतर आणि एनडीएला पाठिंबा जाहीर केल्यानंतर नारायण राणेंना पहिलाच दौरा आहे. नवनिर्वाचित पक्षाच्या सक्षम उभारणीसाठी महाराष्ट्र राणे पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यात भेटीगाठी करणार आहेत.