Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईMaharashtra Vidhan Sabha : भाजपा-शिवसेनेतील 19 आयारामांना मतदारांनी लाथाडलं!

Maharashtra Vidhan Sabha : भाजपा-शिवसेनेतील 19 आयारामांना मतदारांनी लाथाडलं!

Minister Eknath Shinde BJP Sena kalyanमुंबई : मतदारांना गृहीत धरून उमेदवारी अर्जभरेपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून 35 आजी,माजी आमदार,पदाधिकारी शिवसेना भाजपामध्ये दाखल झाले होते. निवडणुकीच्या मैदानात आयारामांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी 19 उमेदवारांचा मतदारांनी पराभव केला.
भाजपात आलेल्या वैभव पिचड (राष्ट्रवादी), हर्षवर्धन पाटील (काँग्रेस), गोपालदास अग्रवाल (काँग्रेस), गोपिचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी), धैर्यशील कदम (काँग्रेस), रमेश आडसकर, भरत गावित, उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) या उमेदवारांचा पराभव झाला आहे. तसेच जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस), दिलीप सोपल (राष्ट्रवादी), भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), शेखर गोरे (राष्ट्रवादी), रश्मी बागल (राष्ट्रवादी), विजय पाटील, संजय कोकाटे, दिलीप माने (काँग्रेस), नागनाथ क्षीरसागर, निर्मला गावित (काँग्रेस), प्रदीप शर्मा या शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
पराभव झालेल्या या आयाराम उमेदवारांमध्ये शिवसेनेचे 11 तर भाजपाच्या 8 उमेदवारांचा समावेश आहे. या निकालाद्वारे पक्षांतर करणाऱ्यांना जनतेने दिलेले हा सर्वांत मोठा संदेश आहे की आयाराम कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांचा पराभव होऊ शकतो. हा संदेश मतदारांनी दिला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments