मुंबई: भाजपामध्ये गेलेले निवडणुकीनंतर परत येतील. भाजपामध्ये जे जात आहेत ते तुम्हाला दिसतात परंतु आमच्याकडे जे येत आहेत ते माध्यमांना दिसत नाही. असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
वंचित बहुजन आघाडी सर्व 288 जागा लढवणार आहे. मंगळवारी संध्याकाळ उमेदवारांची यादी जाहीर करु असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर हे निवडणुकीसाठी गेले आहेत. ते निवडणुकीनंतर आमच्याकडे परत येतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून आमचा पक्ष घराणेशाहीचा पक्ष नाही. असेही आंबेडकर म्हणालेत. संभाजी भिडेंच्या त्या वक्तव्यावर आंबेडकर म्हणाले मी विद्ववान लोकांबद्दल बोलत नाही असा टोला आंबेडकर यांनी भिडेंना लगावला.