मुंबई : मी विरोधाला विरोध करत नाहीत. जे चांगल्याला चांगल बोलतो. मात्र, मुंबईतून जाणारी मेट्रोच मराठी माणसाचा घात करणार असा खळबळजन आरोप राज ठाकरे यांनी केला.
मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रभादेवीच्या सभेत राज ठाकरे बोलत होते. आरेचं जंगल एका रात्रीत नष्ट केलं. हे सरकार तुमच्या इच्छा आकाक्षांवर वरवंटा फिरवतं आहे. पायाभूत सुविधांच्या नावाखाली मेट्रो आणली जाणार, मग जागांचे भाव आणखी वाढत जाणार. या जागा मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर जाणार, गेलेल्या आहेतच. मेट्रो आल्यावर आणखी दर वाढणार. आरेतली झाडं या सरकारने चिरडली तसंच तुम्हाला चिरडणार असाही आरोप त्यांनी केला.
मंदीवरूनही राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मी आधीच सांगितलं होतं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांनीही नोटबंदीच्या वेळी दावा केला होता. मात्र, त्यावेळी सर्वांनी दुर्लक्ष केले. असेही राज ठाकरे म्हणाले.