मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कार्यालयांतील बायोमेट्रीक हजेरीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा प्रचार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सामान्य प्रशासन विभागानं या बाबत निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विषाणूचा प्रचार होऊ नये, अधिकारी, कर्मचा-यां त्याचा संसर्ग होऊ नये या उद्देशानं बायोमेट्रीक पध्दत पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. दरम्यान विधीमंडळामध्ये काही आमदारांनी बायोमेट्रीक पध्दती काही काळासाठी बंद करण्याची मागणी केली होती.