मुंबई : आरे च्या जंगलातील मेट्रोच्या कारशेडबाबत सर्व स्तरातून संतापव्यक्त केला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही आपली भूमिका व्यक्त केली आहे. नाणारचं जे झालं तेच आरेचं होईल असंही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे येत्या काळात आरेतील मेट्रो कारशेडवरुन भाजपा आणि शिवसेना यांच्यात वाद जुंपण्याची चिन्हं आहेत.
मुख्यमंत्री हे आरेमध्ये कारशेडसाठी आग्रही आहेत. मात्र कारशेडला भाजपासोडून सर्वच पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची चांगलीच गोची झाली आहे. नागरिकांचा विरोध झुगारून भाजपाने झाडांच्या कत्तली केल्या तर प्रकरण आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.