मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत चांगलीच रंगत आणली. ते नसते तर निवडणूक बेचव झाली असती. मात्र, त्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
राऊत म्हणाले की, काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची कामगिरी नक्कीच चांगली राहिली. काँग्रेसकडे नेता नव्हता. त्यांचे नेते स्वतःच्या मतदारसंघात अडकून पडले, असंही राऊत म्हणाले. उदयनराजेंनी लोकांवर निवडणूक लादली. लोकांना गृहीत धरण्याचा परिणाम उदयनराजे यांना दिसेल. यंदा उदयनराजेंनाही निवडणूक कठीण गेली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळतील, याची खात्री वाटतेय, असं संजय राऊत म्हणाले. मच्यासमोर चांगला विरोधी पक्ष असावा ही आमची भूमिका आहे. विरोधी पक्षनेता पलटी मारणारा असू नये. विचारांशी ठाम असावा, महाराष्ट्राशी प्रामाणिक असावा, शेवटपर्यंत विरोधी पक्षनेता राहावा. असाही टोला राऊत यांनी लगावला.