मुंबई : कोरोनाचा थैमान वाढला असून,राज्यातली परिस्थिती संवेदनशील झाली आहे. गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असून आज मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
देशभरात कोरानाच्या रुग्णसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहेत. जवळपास ३९ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात आतापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खासगी कंपन्यांच्या प्रमुखांसोबत आज बैठक झाली. कंपन्यांच्या मालकांनाही कंपन्या बंद करुन सहकार्य करण्यासाठी सकारात्मकता दाखवली. तसेच लोकल, मेट्रोमध्ये गर्दी कमी करण्यासाठी मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी बोलणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत चर्चा करण्यात येणार आहे. अशीही माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.