मुंबई: राज्यपालांनी सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीला राज्यपालांनी आज मंगळवार रात्री साडेआठ वाजेपर्यंतीची वेळ दिली होती. मात्र, राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी दुपारी 3 वाजून 16 मिनिटांनी शिफारस केली होती. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली.
महाराष्ट्रात सत्तस्थापनेचा अभूतपूर्व घोळ निर्माण झाला आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसला आज मंगळवारी रात्री साडेआठ पर्यंत सत्ता स्थापण्याचा दावा करण्याआधी राष्ट्रपती राजवटचा घाट घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.