Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमंत्र्यानो साडे पाच वाजेपर्यंत दालनं खाली करा

मंत्र्यानो साडे पाच वाजेपर्यंत दालनं खाली करा

मुंबई : राज्यात काल राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आज मंत्र्यांना त्यांची दालने साडे पाच वाजेपर्यंत खाली करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रालयात आवराआवर सुरु झाली आहे.

राष्ट्रपती राजवटीमुळे सर्व मंत्र्यांच्या दालनातील फाईल,दस्ताऐवज सिल करुन ठेवण्याचे काम सुरु आहेत. त्यामुळे मंत्रालयात सर्व मंत्र्याच्या दालनांमध्ये आवरा आवर सुरु झाली आहे. जे अतिरीक्त कर्मचारी मंत्र्यांच्या सेवेत देण्यात आले होते त्या कर्मचा-यांना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सर्वांचीच चांगलीच तारांबळ उडालेली दिसून येत आहे.

राष्ट्रपती राजवटीमुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांनी कालच जोरदार टीका केली होती. त्यामुळे किती दिवस राष्ट्रपती राजवट असणार आहे. राज्यात कधी सत्तास्थापन होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments