मुंबई : हैदराबाद घटनेतील आरोपींचा आज एन्काउंटर करण्यात आला. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी आपलं मत मांडलं. कायद्याची प्रक्रिया पूर्ण करुन चौकात फाशी दिली असती तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असती. अशी प्रतिक्रिया मलिक यांनी व्यक्त केली.
नवाब मलिक म्हणाले, न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक आहे. असे नवाब मलिक यांनी सांगितले. हैदराबादमध्ये जी घटना घडली होती. त्या घटनेतील चार आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. न्याय देण्याची ही पद्धत नाही. अन्यायकारक पद्धतीने न्याय देणे योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
या एन्काउंटरचे पडसाद देशभर उमटत आहेत. सामान्य नागरिकांनी हैदराबाद पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. पीडितेला तत्काळ न्याय मिळाल्याची लोकांची भावना आहे. मात्र, बुद्धिजीवी वर्गात या घटनेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही मंडळींनी या प्रकरणी प्रश्न उपस्थितीत केले आहे.