मुंबई : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे नाराज असलेल्या चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीनं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. केंद्रातल्या मोदी सरकारमधल्या टीडीपीच्या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. टीडीपीच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
‘स्वाभीमान विरुद्ध स्वाभीमान’ असं व्यंगचित्र राज ठाकरेंनी काढलं आहे. ‘यात कसला मर्दपणा? त्यांना म्हणावं हिंमत असेल तर सरकारमध्ये राहून, अपमान गिळून वर सरकारला धमक्या देऊन दाखवा!’ असं उद्धव ठाकरे संजय राउत यांना सांगतं असल्याचं राज ठाकरेंनी या व्यंगचित्रामध्ये दाखवलं आहे.