मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली. स्पप्न पाहण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंना टोला लगावला. निकाला आधीच भाजपाने सेनेला कोंडीत पकडण्याचे काम सुरु केले. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा शिवसेनेतर्फे सुरु आहे. मात्र, एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला असून तो कोणी हिरावून घेऊ शकत नसल्याचं म्हटलं. शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहे. त्यामुळे कोण काय बोलेल याचा विचार केला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आधी अमित शाह यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस, त्यांची टीम आणि भाजपाची संसदीय कार्यसमिती घेईल असं म्हणत पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील याचे संकेत दिले आहे. त्यामुळे भाजपच्या मर्जीनुसार सर्वकाही होईल हे स्पष्ट होतं.