मुंबई : हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आम्हाला येथे घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही लढू, संपून जावू आणि प्रसंगी संपवून टाकू, हा महाराष्ट्र घाबरणाऱ्यातला नाही, असा सज्जड दम शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष सरकार स्थापन करणार आहेत हे जवळपास निश्चित झालं आहे. बैठका आणि चर्चांचा सिलसिला सुरु आहे. दरम्यान, आज राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा जोरदार समाचार घेतला. त्यावेळी भाजपच नाव न घेता त्यांचा सज्जड दम दिला.
काँग्रेस नेते बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर येताना दिसत नाही, या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, मीडियाकडे अपूर्ण माहिती आहे. तसेच सध्या बोलणी सुरू आहे. सर्व पक्षाचे नेते नेमके कुठे आहेत, त्यांना कोणती वेळ आणि कोणतं ठिकाण जवळ आहे, त्यावरून हे ठरतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.