राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषीमंत्रीपदी असतांना त्यांच्यावर २०११ साली हल्ला झाला होता. तब्बल आठ वर्षानंतर हल्लेखोरालानी अटक केली.
अरविंद्र सिंग असे हल्लेखोराचे नाव आहे. शरद पवारांवर हल्ला केल्यानंतर अरविंदर मागील आठ वर्षांपासून फरार होता. दिल्ली न्यायालयाने २०१४ मध्ये त्याला गुन्हेगार घोषित केलं होतं. अरविंदरला आज पोलिसांनी दिल्लीमधून अटक केली. दिल्लीमध्ये ट्रान्सपोर्टर म्हणून काम करणाऱ्या अरविंदरने आपण महागाईमुळे आणि भ्रष्टाचाराने वैतागलो असून योग्य नियोजन करुन तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली होती.
सुरक्षका रक्षकांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला…
शरद पवारांच्या चेहऱ्यावर हाताने मारले होते. तसेच आरोपी अरविंद्र जवळ धारदार शस्त्र होते. तो हल्ला करण्याच्या इराद्यामध्ये होता. त्यासाठी त्याने हत्यारही उपसलं होतं. पण सुरक्षा रक्षकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत त्याला पवारांपासून दूर ढकललं होतं. त्यावेळी सुरक्षा रक्षकांच्यामुळे पवारांचा जीव वाचला.