राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुरु आहे. यामध्ये शिवसेनेच्या नेत्याने भूमिका व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, तेच त्या पदासाठी लायक आहेत. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान होतील, त्यांनी तसं दाखवून दिलं आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
किशोर तिवारी यांनी या मागणीचं पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाठवलं आहे. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुरु असताना, किशोर तिवारी यांनी त्याबाबत आपली भूमिका व्यक्त केली. किशोर तिवारी म्हणाले, की, सध्याच्या सत्तासंघर्षात नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी. भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या एकाधिकारशाहीमुळे युतीत तिढा निर्माण झाला आहे. संजय राऊत जे बोलत आहेत ते खरं आहे. शिवसेनेला दिलेला शब्द भाजपने पाळावा. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान होतील, त्यांनी तसं दाखवून दिलं आहे. असंही तिवारी यांनी सांगितलं.